मी आणि गाढवं - ३
कोल्हापुराला निवड झाली असा कमलेशचा मेसेज आला. रविवारी संध्याकाळी तो घरी भेटायला आला.
काय रे कधी चाललाय कोल्हापुराला?
-वेळ आहे अजून, एक-दीड महिना तरी लागेल.
तू तर निवड झाली म्हणून SMS पाठवला होता.
- तसं confirm आहे. पण कॉल लेटर आल्यावर join होणार. आणि कॉल लेटरला एक-दीड महिना तरी लागेल.
कोल्हापूर म्हणजे बरंच लांब होतंय. जवळपास बघायचं ना.
-तसं ठाण्याला पण जागा आहेत. भिवंडीला पण आहेत. आणि पुण्याला कालच जाऊन आलोय.
मग ठाणे किंवा भिवंडी जवळ पडेल तिकडे try कर, कोल्हापुराला कशाला चाललाय.
- अरे interview देऊन ठेवतो, कधी काय होईल ते माहीत नाही.
का?
-भिवंडीला आणि कोल्हापुराला stay आणलाय.
भिवंडीला stay? कशासाठी?
- तिकडे त्यांना मुसलमान लोकांची भरती करायची.
अरे पण असा stay कसा आणता येईल. शक्य नाही.
- सगळं possible आहे. जाम लफडी असतात रे, सगळं पॉलिटिक्स आहे.
नाही असा stay शक्य नाही, कोर्टात अशी केस उभी राहूच शकत नाही.
- एकदा कोर्टात गेलं की त्याला २-३ वर्षे लागतील, मग आम्ही लटकलो ना, म्हणून मी सगळीकडे interview देऊन येतोय.
आणि कोल्हापुराला काय झालं?
- तिकडेपण नगरसेवकाने असाच stay आणलाय.
म्हणजे?
- स्थानिक लोकांना भरती करायचं म्हणून.
हां बरोबर आहे त्यांचं. अरे म्हणजे भिवंडीलापण असाच stay असला पाहिजे.
- हो पण तिकडे स्थानिक म्हणजे सगळे मुसलमानच ना.
पण तू ज्यापध्दतीने सांगितलं त्यामुळे काही भलताच अर्थ निघतो ना. मला वाटलं फक्त मुसलमान लोकांना घ्यायचंय म्हणून stay order आणलीय.
- अरे पण ते understood आहे ना. तिकडे स्थानिक काय अन मुसलमान काय एकच.
मला माझ्या वैचारिक मागासलेपणाची कीव आली.
