मी आणि गाढवं - २
माझ्या अज्ञानाचा फायदा घेत राहुलने मला इतिहासाचे धडे देण्याचा प्रयत्न केला.
"हिंदू धर्मात मंदिर बांधण्याची प्रथा नव्हतीच मूळी. बौद्ध आणि जैन धर्माच्या अस्तानंतर ही प्रथा सुरू झाली. अत्यंत अमानुषपणे त्यांच्या कत्तली करण्यात आल्या त्यांची प्राथनास्थळे पाडून तिथे मंदिरे बांधण्यात आली. जिथे "पाडण्यासारखी" गोष्ट शक्य नव्हती तिथे सरळसरळ हिंदू देवतांची स्थापना केली गेली. लेणी, गुंफा बघ. बौद्ध लेण्यात हिंदू देवता सुखाने नांदताना दिसतात."
"पुढे मुसलमान आले. त्यांनी मंदिरे पाडून मशीदी बांधल्या. हे होणारच होते त्यावेळेस राजेशाही होती ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने जग चालते.
पण आता काय? लोकशाहीत आपण मशीदी पाडतोय,
बाबरी पाडली……मंदिर होतं म्हणून….पाडूद्या.
ताजमहालही पाडू…..
आणि कोणी म्हणालं, मंदिराखाली बौद्ध, जैन किंवा द्रविड मंदिर होत तर…… तर काय करणार?
ते जाऊदे… ज्या बौद्ध, जैन लेण्यामध्ये मंदिरं आहेत, जिथं काही उकरायची गरज नाही, त्याचं काय?"
माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहुल विजयी मुद्रेने निघून गेला.

lekha aavaDale.. likhaaNatalaa kiMchit tirakasapaNaahii mast !
lihit rahaa!
Comment by giri — July 4, 2006, 5:09 pm @ 5:09 pm
lok kay kay gadhvasarakhe boltata ani apan aikto.Then reders who read this send comment to post like gadhav again
Comment by pankaj — July 5, 2006, 4:37 pm @ 4:37 pm
Ambarnath, Thane yethe Pandav kalin mandire aahet kinva baryach thikani Pandavkalin leni aahet. Barich mandire bouddh kinva jain kalkhandaa adhichi aahet. Hindu dharmat Mandire bandhnyachi paddhat nhavti yala kahi aadhar aahe ka? Baki tumche likhan jabardast catching aahe.
Comment by abhijit — August 17, 2006, 5:06 pm @ 5:06 pm